चीनची हेरगिरी उपकरणे भारतासमोर कुचकामी   

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान संघर्ष उफाळून आल्यानंतर चीनने पाकिस्तानला भारतावर हेरगिरी करण्यासाठी यंत्रणा दिली होती. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर आणि सैन्याच्या भेदक मार्‍यापुढे ती कुचकामी ठरल्याचे उघड होत आहे. 
 
चीनने पाकिस्तानला भारताच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवता यावे, याासाठी रडार, उपग्रहसेवा पुरवली होती. चीनने अगोदरच जे १० सी लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे पुरवली होती. त्यानंतर संघर्ष वाढत असल्याचे पाहून सीमावर्ती भागांत भारतीय सैन्य हालचालीचा मागोवा घेता यावा, यासाठी त्याने रडार आणि उपग्रहांची दिशा देखील बदलली होती. या माहितीचा वापर करुन भारतीय सैन्य दलाचा खडानखडा तपशील प्राप्त करण्यात पाकिस्तानला यश मिळाल्याचे एका अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे कोणताही हवाई हल्ला परतावणे आणि संरक्षण करणे शक्य झाले. तेव्हा चीनने आपले उपग्रह भारतीय भूभागांवर आणले होते. तसेच युद्ध लांबले तर १५ दिवस पुरेल एवढा शस्त्रसाठा दिला होता. या माध्यमातून चीन आपल्या शस्त्रे, रडार यंत्रणा आणि उपग्रहांची एक प्रकारे चाचणी घेत होता. मात्र, भारताच्या आक्रमक कारवाईनंतर चीनची उपकरणे, विमाने आणि क्षेपणास्त्रे टिकली नसल्याचेे उघड झाली आहे. पाकिस्तानला भरीव लष्करी आणि हेरगिरीची मदत देऊनही पाकिस्तानवर आक्रमक कारवाई केली. आठ दहशतवादी तळ, ११ लष्करी ठाणी नष्ट केली. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनची जगभर नाच्चकी झाली. तसेच पाकिस्तानबरोबरच चीनची जगभर छी थू झाली. 

Related Articles